गोदावरी नदीच्या पात्रात कपडे व टाकावु पदार्थ टाकून नदीला दुशीत करु नका – अविनाश गायकवाड

गंगापूर (प्रतिनिधी) श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर कायगाव टोका परिसरात व गोदावरी नदी पात्रात अनेक गावातून तालुक्यातून व जिल्ह्यातून अंत्यविधीसाठी व दहाव्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक येतात. नदीपात्रामध्ये मृतांचे कपडे, शाल, नारळ, फुल, नदीपात्रात टाकून गोदावरी नदीचं पाणी दूषित करतात.

त्या विधीसाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकानी नदीचं पाणी दूषित करू नये. पर्यावरणाची दक्षता सर्वांनी घ्यायची आहे. रामेश्वर मंदिराच्या परिसरात एका घाटावर हाऊद तयार केलेला आहे. तरी सर्वांनी त्याचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

आपण आपलं घर, मंदिर आसपासचा परिसर स्वच्छ ठेवतो.तसं आपला परिसर, नदी, स्वच्छ ठेवली पाहिजे.

असे आवाहन अविनाश भाऊ गायकवाड मित्र मंडळ जामगाव, कायगाव, गंगापूरचे अभिषेक बनसोडे, प्रकाश बनसोडे, आशिष पारखे, किरण सोनवणे, मंगेश बनसोडे, शाहरुख पठाण, समीर शेख, नारायण गायकवाड, विकास तुपलोंढे, संकेत तुपलोंढे, संदीप तुपलोंढे, शुभम लोंढे, संदेश तुपलोंढे आंदीनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!