मनुष्याने नित्यनेमाने भगवंताचे नामचिंतन करावे ह.भ.प हरीशरणगिरी महाराज
ममदापुर येथे आयोजित सप्ताहात बाजाठाण रामदरबार आश्रमाचे प्रमुख ह.भ.प.हरीशरणगिरीजी महाराज यांच्या पाचव्या दिवसाच्या कीर्तन सेवेने पुष्प गुंफले गेले यावेळी महाराजांनी आपल्या अमृतवाणीतून भगवंतांचे नाम चिंतन करा,मनुष्याने आपल्या जीवनात नाम,भक्ती जोडावी. जो भेटेल त्याला देवाची आठवण करून देतो तो साधक असतो,ज्यांना सर्वत्र देव दिसतो तो भक्त,मानुस जन्माला आला तर मरणार आहे मरणाला सर्वांना सामोरे जायेचे आहे भगवंतांचे नाम चिंतन जप हा महत्त्वाचा आहे. दान करा तुकोबाराय नेहमी म्हणायचे विठ्ठल मंत्राचा जप करा,मनुष्याने भगवंताचे नामस्मरण नित्यनेमाने करावे नामात भवसागर तरुण जाण्याची शक्ती,मनाचा आहार चिंतन आहे.मन भगवंताच्या नामात गुंतल्यावर गाठी उकलतील, कीर्तनसेवे प्रसंगी पंचक्रोशीतील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी सप्ताह कमिटी ,तरुण मंडळ,ग्रामस्थ परिश्रम घेत आहे