गंगापूर (प्रतिनिधी) नांदूर मधमेश्वर एक्सप्रेस कॅनॉलच्या वरच्या भागातील पाणी चोरी रोखण्यात अपयशी ठरलेले पाटबंधारे विभागाचे अधिकारी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपले अपयश झाकण्यासाठी गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा संघटक वाल्मिक शिरसाठ यांनी केला आहे.