“दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा”अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तच्या जयघोषाने देवगड नगरी दुमदुमली ..शंख निनाद व पुष्पवृष्टी करत श्री क्षेत्र देवगड येथे श्री दत्तजन्म सोहळा साजरा..सप्ताह काळात लाखो भाविकांनी घेतले भगवान दत्तात्रयांचे दर्शन


नेवासा(प्रतिनिधी)दिगंबरा …दिगंबरा ..श्रीपादवल्लभ ..दिगंबरा असायघोष व पुष्पांची वृष्टी …शंखाचा निनाद.तोफांची सलामी व फटाक्यांची आतषबाजी करत नेवासा तालुक्यातील भू लोकीचा स्वर्ग अशी ओळख असलेल्या श्री क्षेत्र देवगड येथे श्री दत्तजन्म सोहळा मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला.यावेळी गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबांच्या हस्ते पाळण्याची दोरी ओढण्यात आली. यावेळी झालेल्या जन्मोत्सव सोहळयाच्या प्रसंगी दत्त नामाच्या जयघोषाने देवगड दुमदुमली होती.दत्त जन्मोत्सवाच्या निमित्ताने लाखो भाविकांनी भगवान दत्तात्रयांचे दर्शन घेतले.
         मंगळवारी दि.२६ डिसेंबर रोजी श्री दत्तजयंती उत्सवाच्या निमित्ताने श्री गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख महंत श्री भास्करगिरीजी महाराज व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते पहाटेच्या सुमारास भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीस वेदमंत्राच्या जयघोषात अभिषेक घालण्यात आला.यावेळी   सकाळी श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या पालखीची मंदिर प्रदक्षिणा मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीमध्ये गुरुवर्य श्री भास्करगिरी महाराज स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या समवेत हातात भागवत धर्माची पताका घेतलेले वारकरी,टाळ मृदुंगाचा गजर करणारे भजनी सेवेकरी सहभागी झाले होते.
    दुपारच्या सत्रात ब्रम्हवृंद मंडळींच्या उपस्थितीत पाच दिवस यज्ञ मंडपात चाललेल्या श्री दत्त यागाची सांगता गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या हस्ते विधिवत पूजेने होमकुंडात श्रीफळ अर्पण करून पूर्णाहुती देऊन करण्यात आली.यावेळी दत्त यागाचे पौरोहित्य करणाऱ्या सर्व ब्रम्हवृंद मंडळींचा पाचीपोषाख देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी दत्त यागामध्ये स्थापित केलेल्या भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीची ब्रम्हवृंद मंडळींच्या उपस्थितीत वाजत गाजत प्रवरा नदी तीरावर नेण्यात आली तेथे अवधूत स्नानाचा धार्मिक विधी वेदमंत्राच्या जयघोषात पार पडला.
            दत्तजयंती निमित्त पहाटे पासूनच गर्दीचा ओघ मोठ्या प्रमाणात दिसून आला.दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी दर्शन बारीत उभे राहून नियमांचे पालन करत भगवान दत्तात्रयांसह श्री किसनगिरी बाबा समाधी मंदिर,पंचमुखी सिद्धेश्वराचे दर्शन घेतले.यावेळी गुरुवर्य श्री भास्करगिरी बाबा व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराजांनी दत्तजयंती निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भक्तांसी सुसंवाद साधत हसतमुखाने स्वागत केले. सायंकाळी ६ वाजता झालेल्या श्री दत्त जन्म सोहळयाच्या प्रसंगी गुरुवर्य भास्करगिरी महाराज व स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते पुष्पांनी सजविण्यात आलेल्या पाळण्यातील भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या हस्ते विधिवत पूजन झाल्यानंतर स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज, महंत कैलासगिरीजी महाराज,महंत सुनीलगिरी महाराज,महंत रमेशानंदगिरी महाराज,महंत बालयोगी ऋषिनाथजी महाराज, महंत गणेशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.यावेळी शांतीपाठ म्हणण्यात आला.यावेळी गुरुवर्य श्री भास्करगिरी बाबा यांच्यासह त्यांच्या मातोश्री श्रीमती सरुबाई पाटील,स्वामींच्या मातोश्री सौ.मीराबाई मते,सौ.शालिनीताई विखे व उपस्थित संत महंतांचे हस्ते पाळण्याची दोरी ओढण्यात आली.नेवासा येथील गायिका सौ.माधुरीताई कुलकर्णी यांनी दत्त जन्माचा पाळणा म्हटला त्यांना शिक्षिका सुप्रिया इंगळे,ज्ञानेश्वर काळे व सहकाऱ्यांनी संगीत साथ दिली
यावेळी झालेल्या दत्त जन्म सोहळयाच्या प्रसंगी नगर जिल्हा कोर्टाचे न्यायाधीश श्री पाटील,श्री चव्हाण,माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे,खासदार सदाशिव लोखंडे,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, जिल्हाधिकारी सीताराम सालीमठ,प्रांताधिकारी सुधीर पाटील,नेवासा तालुक्याचे आमदार माजी मंत्री शंकरराव गडाख,माजी आमदार पांडुरंग अभंग,बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, काशिनाथ नवले,उद्योजक बापूसाहेब नजन, सुधाकरराव आव्हाड,छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवक पतसंस्थेचे माजी अध्यक्ष सुदामराव बनसोडे,विश्व हिंदू परिषदेचे आप्पा बारगजे, अँड.सुनील चावरे बजरंग विधाते, मुरमे ग्रामपंचायतचे मार्गदर्शक अजय साबळे,सरपंच सौ.कविताताई साबळे,पोलीस पाटील सुभाष भांगे,मुळा कारखान्याचे संचालक व देवगड सेवेकरी बाळासाहेब पाटील,संतसेवक बाळू महाराज कानडे, तात्या महाराज शिंदे,शुभम महाराज बनकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

 भगवान दत्तात्रयांचा जन्म सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्यानंतर उपस्थित भाविकांना मंदिर परिसरात असलेल्या अन्नपूर्णा मैदानात उपस्थित हजारो भाविकांना आमटी भाकरी  प्रसादाचे वाटप करण्यात आले.दत्तजयंती निमित्ताने मंदिर परिसरात मोठी यात्रा भरली होती.या यात्रेमध्ये विविध प्रकारची स्टॉल दुकानदारांनी थाटली होती नेवासा पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य तपासणी करून मोफत औषधे गोळ्या देण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
नेवासा पोलीस स्टेशनच्या वतीने यात्रेत पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात व पोलीस यंत्रणेने चोख बंदोबस्त ठेवला होता तर होमगार्ड समादेशक पत्रकार बाळासाहेब देवखिळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे पन्नास होमगार्ड महिला व जवानांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन बंदोबस्त करत मोलाची भूमिका बजावली.
दत्तजयंती उत्सवाची निमित्ताने एक महिना अगोदरच गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबांच्या अध्यक्षतेखाली विविध खात्याच्या अधिकारी पदाधिकारी यांच्या समवेत नियोजन बैठक घेण्यात आली होती.त्यानुसार यात्रेतील येणाऱ्या दुकानदारांसाठी रेषा आखून दुकाने लावण्यासाठी दत्त मंदिर देवस्थानच्या वतीने जागा उपलब्ध करून देण्यात आली होती.परिसरात वाहन पार्किंग व्यवस्था,बस स्टॅन्ड,पिण्याचे पाणी,दर्शन बारीद्वारे दर्शन व्यवस्था,प्रवरा नदीतून पैलतीर जाण्यासाठी बोटींची व्यवस्था, अन्नपूर्णा मैदानात भोजन व्यवस्था तैनात करण्यात आल्याने भाविकांची मोठी सेवा झाली.
देवगडचा दत्तजयंती उत्सव राज्यात आदर्शवत असल्याने पहाटेपासूनच येथे दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. नेवासा,नगर,शेवगाव,गंगापूर या आगाराच्या वतीने जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती.दुचाकी व चारचाकी वाहनांनी देखील भाविक मोठ्या प्रमाणात आल्यामुळे देवस्थानच्या वतीने पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती.
त्यामुळे दत्त दर्शनासाठी जातांना भाविकांना त्रास जाणवला नाही,गोपुर महाद्वारापासून दर्शन बारीची व्यवस्था करण्यात आली होती. दत्तजयंती महोत्सवात व सप्ताह काळात अनेक मंत्री व विविध पक्षाचे नेते यांनी देवगड येथे भेट देऊन भगवान दत्तात्रयांचे दर्शन घेतले.

चौकट-समाजात चांगले काय आहे याचा प्रचार करणे हे पत्रकारांचे काम आहे त्यादृष्टीने पत्रकारांचे काम सुरू आहे
ब्रम्हा, विष्णू महेश हे तिन्ही देवांचे एकीकरण म्हणजे दत्त अवतार,कोरोना येत भीती बाळगू नका,त्याला नियमांचे पालनजाग्यावरच त्याला संपवा,२२ जानेवारी आदर्शवत ठरेल असा कार्यक्रम हा संपूर्ण भारतीयांचा कार्यक्रम आहे,तेथे जाऊन गर्दी करू नका,गावातच मंदिरात गावात गुढ्या उभारा,नवीन वस्त्र परिधान करा व प्रभू रामचंद्र भगवंतांचे भजने गाऊन गुणगान करा असे आवाहन गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांनी यावेळी बोलताना केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!