स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच गडचिरोली’ च्या वतीने नविन वर्षात “आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता” हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते. या कवितेला “आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी” म्हणून पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते.
या उपक्रमाचे तृतीय सत्र नुकतेच पार पडले असून यात ३० कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून गोंदिया जिल्ह्यातील
मौजा – खडकी (बामणी) तालूका – सडक अर्जुनी येथील मुर्लीधर खोटेले यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या झाडीबोलीतील “देव माजा ‘ या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे, कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.
कवी मुर्लीधर खोटेले हे झाडीपट्टीतील प्रसिद्ध कवी असून ते प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत आहेत. ते प्रामुख्याने झाडीबोलीतून कविता लिहीतात. आजवर त्यांचे ‘ माती मिरली मातीत, झाडीतला गाव, माती… जुल्ला नार, दावन व मातीतून अबारात’ हे पाच झाडीबोलीत लिहीलेले कवितासंग्रह प्रकाशित झालेले असून ते सातत्याने कवितालेखनाचे कार्य करीत आहे. अनेक पुरस्काराने ते सन्मानित आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे व प्रा. अरुण बुरे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या तिसऱ्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने हरिष नैताम, प्रब्रम्हानंद मडावी, माधुरी अमृतकर, प्रभाकर दुर्गे, राज मुंजाळ, सत्तू भांडेकर, पराग दडवे, पुरुषोत्तम लेनगुरे, मनोहर दुधबावरे, सुनील मंगर, रुपाली म्हस्के, संजय बन्सल, कृष्णा कुंभारे, तुळशीराम उंदीरवाडे, गजानन गेडाम, पी. डी. काटकर, जितू निलेकार, लता शेंद्रे, चरणदास वैरागडे, प्रतिभा सुर्याराव, वंदना मडावी, स्वप्नील बांबोळे, बाबाजी व्ही. हुले, मुर्लीधर खोटेले, प्रिती चहांदे, मिलिंद खोब्रागडे, पल्लवी ढोलगे, खुशाल म्हशाखेत्री, व ज्योत्स्ना बन्सोड इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.
या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.