गंगापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील भालगांवच्या ४५ वर्षीय शेतकऱ्याचा पन्नास फुट खोल विहिरीत पडल्याने मृत्यू झाला
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर तालुक्यातील भालगांव येथील शेतकरी हरीभाऊ काशीनाथ को-हाळे (४५) हे जनार्दन साठे यांच्या गट क्रमांक १४९ मध्ये विहिरीचे खोदकाम सुरू असताना १८ मार्च रोजी दुपारी चार वाजता गेले असता को-हाळे हे पन्नास फुट खोल विहीरीत पडले त्यांना विहीरीतुन काढून गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले असून १९ मार्च रोजी सकाळी शवविच्छेदन करण्यात येणार आहे या प्रकरणी शिल्लेगांव पोलिस पुढील कारवाई करत आहे.