गंगापूर (प्रतिनिधी). छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावरील कायगांव टोका येथील गोदावरी नदीच्या पुलावरून उडी मारून ६८ वर्षीय उद्योगपतीने आपली जीवन यात्रा संपवीली आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जसबिरसिंग जितसिंग कंबो वय ६८ राहणार शांतीनिकेतन कॉलनी,संत एकनाथ सोसायटी छत्रपती संभाजीनगर असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.
शुक्रवार १ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते १ वाजेदररम्यान जसबिरसिंग कंबो आपल्या कार मध्ये बसून छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावरील जुने कायगाव येथील गोदावरी नदीच्या पुलावर आले या ठिकाणी त्यांनी मोबाईलवरून घरी सांगितले की मी कायगाव येथे पाणी पाहण्यासाठी आलो आहे असे सांगितले होते . दरम्यान त्यांनी आपल्या चारचाकी चे दरवाजे उघडे ठेवून आपला मोबाईल कार मध्येच ठेवून पुलावरून पाण्यात उडी मारली सदर बाब उपस्थितांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची खबर दिली.
पोलिसांनी घटनास्थळ गाठले व स्थानिकांच्या मदतीने पुलाखाली पाण्यात बुडालेले जसबिरसिंग
कंबो यांना पाण्याबाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात हलविले या ठिकाणी उपस्थित डॉक्टरांनी तपासून मृत झाल्याचे घोषित केले. सायंकाळी उशिरा शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. कोंबो यांनी आत्महत्या का केली याचे कारण मात्र कळू शकले नाही.