गंगापूर (प्रतिनिधी) अहमदनगर येथे ओबीसी एल्गार मेळाव्याला जामगाव येथुन ४० गाड्या फटाक्यांची आतषबाजी करत ओबीसी नेते छगन भुजबळ यांचे कारखाना जामगाव फाट्यावर स्वागत करुन सोबत रवाना झाले.
अहमदनगर शहरात शनिवारी 3 फेबु्रवारी रोजी ओबीसी-भटके विमुक्त महाएल्गार सभेचे आयोजन करण्यात आले असून, या सभेसाठी ओबीसी, भटक्या विमुक्त समाजाने उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, सावता परीषद, मुस्लिम बांधव, ओबीसी समाजाचे प्रतिनिधी, भटके-विमुक्त समाजाचे पदाधिकारी आणि बहुजन समाजाचे कार्यकर्ते यांच्याकडून करण्यात आले आहे.
या सभेसाठी हजोरोंच्या संख्येने ओबीसी समाज बांधव उपस्थित राहणार असून गंगापूर तालुक्यातील जामगांव येथील चाळीस वाहनातून चारशे ओबीसी बांधव डीजेच्या तालावर वाजत गाजत निघाले. यामध्ये किशोर मगर, ईश्वर पंडीत रघुनाथ मगर, बंडु परदेशी, सुभाष मगर, अशोक पगारे, गणेश पंडित, महेश तागड, गणेश तागड, राजेंद्र थोरात, अमोल तागड, राजेंद्र बोरुडे, नितीन मगर ,बाळु सोलट, नवनाथ शेळके,भोजाडे, गवळी , आदिंसह शेकडो ओबीसी समाज बांधव रवाना झाले