गंगापूर (प्रतिनिधी) आपले घर आणि परिसर स्वच्छ ठेऊन आपण भारताच्या स्वच्छता मोहिमेला बळ देऊ शकतो – सुवर्णाताई जाधव
महात्मा गांधींनी केवळ स्वातंत्र्यासाठीच संघर्ष केला नाही तर भारताला आत्मनिर्भर होण्याचा मार्गही दाखवला. त्यांचे विचार आजही समर्पक आहेत आणि भविष्यातही राहतील. भारत सरकारच्या स्वच्छता मोहिमेत आपण सहभागी व्हायला हवे. आपले घर आणि परिसर स्वच्छ ठेऊन आपण भारताच्या स्वच्छता मोहिमेला बळ देऊ शकतो. यावेळी महिला प्रदेश सरचिटणीस. सुवर्णाताई संजय जाधव,जिल्हा सरचिटणीस.संगीताताई वाघ, तालुकाअध्यक्ष. मनीषाताई बत्त्तीसे, शहर अध्यक्ष. कावेरीताई पाहुणे पा, लताबाई गात आदी उपस्थित होत्या