गायी कापण्यासाठी घेऊन जाता का असे म्हणत चौघांची दोघांना टामीने मारहाण दोन गंभीर.गंगापुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

गायी घेऊन जाणा-यावर हल्ला दोन जखमी चौघांवर गुन्हा दाखल.

गंगापूर (प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावरील भेंडाळा फाट्यावर पिकअप गाडी आडवुन तुम्ही गाया कापायला घेऊन चालले का असे म्हणत गाडीतील दोघांना टामी व काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले या प्रकरणी कायगांव येथील चार युवकावर गुन्हा दाखल.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर ते छत्रपती संभाजी नगर रोडवरील भेंडाळा गावाजवळ १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजेदरम्यान बळीराम फकीरचंद कवळे वय -50 वर्ष व जमील इसाक शेख रा.झाल्टा ता.जि.छत्रपती संभाजी नगर हे पाच गायी व एक गोऱ्हा खरेदी करून त्यांच्या बोलेरो पिकप क्रमांक एम एच १६ ए वाय ८२८० मध्ये बांधून घेऊन जात असताना कालिदास भोगे, अमोल बिरुटे , रोहित बिरुटे, अनिल बिरुटे यांनी संगणमत करून वाहन अडवून गाडीतील जनावरे कोणाचे आहेत, तुम्ही जनावरांना कापण्यासाठी घेऊन चालले आहे, तुम्ही लोक लय माजले, असे म्हणून बळीराम कवळे व जमील इसाक शेख यांना शिवीगाळ करून लाकडी दांड्याने व लोखंडी टामिने मारहाण करून जखमी केल्याने बळीराम फकीरचंद कवळे (५०) वर्ष व्यवसाय -चालक रा. कोळघर ता. जि. छत्रपती संभाजीनगर यांच्या फिर्यादीवरून कालिदास भोगे रा.नवीन कायगाव ता. गंगापूर , अमोल बिरुटे , रोहित बिरुटे ,अनिल बिरुटे तिघे रा. जुने कायगाव ता. गंगापूर यांच्या विरोधात कलम – ३२४,३४१,५०४,३४ भा.द. वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रमोद काळे हे करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!