गंगापुर येथील पंचावन्न वर्षीय महिलेने जीवनाला कंटाळून घेतला गळफास
गंगापुर (प्रतिनिधी)गंगापुर येथे ५५ वर्षीय महिलेने जीवनाला कंटाळून राहत्या घरात साडीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली
पोलिसांकडून मिळालेल्या माहीती नुसार अनिता सुरेश जाधव वय ५५ वर्ष राहणार गढीचा मारोती मंदीरा जवळ (जुनी नगरपरिषदेच्या पाठीमागे) स्वतःच्या घरात मुलगी व मुला सोबत राहत होत्या . सुमारे २० वर्षापूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर त्यांनी दोन मुली व एका मुलास कष्टाने वाढवले यापैकी एका मुलीचे लग्न झालेले असून दुसऱ्या मुलीचा नुकताच साखरपुडा झाला आहे. तर मुलगा कापड दुकानात कामाला आहे. ६ जुलै रोजी सायंकाळी धाकटी मुलगी माधुरी ही कामावरून सहा वाजेच्या दरम्यान घरी आली असता घराचे दार आतून बंद असल्याने आईस हाका मारल्या मात्र आतून प्रतिसाद न मिळाल्याने तिने कापड दुकानात कामावर गेलेल्या भाऊ करण यास फोन करून बोलावले त्याने आल्यानंतर घराच्या भितीवर चढून मागील दरवाजा उघडून आत प्रवेश केल्यानंतर आतमध्ये आईने घराच्या ॲगलला साडीने गळकास घेतल्याचे निदर्शनास आले त्याने तात्काळ शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या मदतीने आईला खाली घेऊन येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले असता त्यांना डॉ सुदाम लगास यांनी तपासून मृत घोषीत केले .
दरम्यान आपण जीवनाला कंटाळून आत्महत्या करीत असून माझ्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये असा मजकूर लिहिलेली चिठ्ठी आढळून आल्याचे बोलले जात आहे.
या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक फौजदार गणेश काथार हे करीत आहेत
![](https://janakrosh.com/wp-content/uploads/2023/07/IMG-20230706-WA0123.jpg)