मराठा आंदोलकानंतर दहीहंडी उत्सवात गोंवीदावर गंगापूर पोलीसांचा लाठीचार्ज…शहरात संतापाची लाट
गंगापूर (प्रतिनिधी)जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकावर लाठीचार्ज केल्याची घटना ताजी असतानाच गंगापूर पोलीसांनी दहीहंडी फोडण्यासाठी आलेल्या गोंवीदावर लाठीचार्ज केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
शांतता भंग करणा-या पोलिसांवर कारवाई कोण करणार.
गंगापूर शहरातील मारुती चौकात ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता दहीहंडी उत्सवाला सुरुवात झाली होती या उत्सवात शहरातील गोंवीदा पथक सहभागी झाले होते रात्री साडे नऊ वाजता दोन गोंवीदापथकामध्ये बाचाबाची झाली असता गंगापूर पोलीसांनी उपस्थित गोविंदा पथकावर लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली यामुळे मारुती चौकात नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले व उपस्थित नागरिक सैरावैरा पळू लागले या लाठीचार्ज मध्ये लहान मुले व गोंवीदा शिकार झाले शहरात शांतता ठेवण्यासाठी पोलिस आहेत की शांतता भंग करण्यासाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
सर तुमचा नंबर पाहिजे बातमी द्यायची aahe
9423453388