महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीला सुद्धा दोन उपसरपंच पद द्या माजी सरपंच मनीषाताई व्यवहारे

*महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीला सुद्धा दोन उपसरपंच पद द्या माजी सरपंच मनीषाताई व्यवहारे*

गंगापूर (प्रतिनिधी) महाराष्ट्राला दोन उपमुख्यमंत्री दिले तसेच ग्रामपंचायतीला दोन उपसरपंच पद देण्यात यावे काटेपिंपळगावच्या माजी सरपंच मनीषाताई व्यवहारे यांची मागणी

ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री गिरीश महाजन,व वैजापूरचे उपविभागीय अधिकारी डॉ अरुण ज-हाड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच दोन उपमुख्यमंत्री नियुक्त केले आहे, याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला दोन उपसरंपच पद नियुक्त केल्यास ग्रामपंचायत स्तरावरील नागरीकांच्या विविध समस्या व मागण्यांचे निराकरण करण्यास मदत होणार आहे व भविष्यात ग्रामपंचायत विभागात मोठा कायापालट होणार असुन विकास कामांना गती मिळुन महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत कार्यालये हे सुजलाम, सुफलाम होतील. आपण आपल्या स्तरावर निवेदनाचा विचार करुन दोन उपसरपंच पदाची नियुक्ती केल्यास हा आपल्या कार्यकाळातील एक नविन इतिहास होणार आहे व अत्यानुसार ग्रामपंचायत कामांत सुधारणा होईल व ग्रामपंचायतीचा दर्जा हा उंचावणार आहे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी डॉ अरुण ज-हाड यांना निवेदन देताना कृष्णकांत व्यवहारे,रुग्ण कल्याण समिती सदस्य अतुल रासकर,भा.ज.पा. शहर चिटणीस प्रशांत मुळे,उपसरपंच प्रकाश फिंपाळे ,ग्रामपंचायत सदस्य भावराव पवार
, खरेदी-विक्री संघाचे संचालक रामभाऊ धोत्रे,
बाबासाहेव धोत्रे ,गोरख राऊत आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!