गंगापूर शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते बसस्थानक रस्त्याचे काम पंधरा दिवसाचे आत करा नसता रिपब्लिकन सेनेच्या वतीने बेशरमांची झाडे लावणार.


गंगापूर (प्रतिनिधी)डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते बस स्टॅन्ड राजीव गांधी चौक जाणारा खराब रस्त्याचे काम त्वरित चालू करा नसता रिपब्लिकन सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
बांधकाम विभाग पश्चिम यांना जिल्हा सचिव बाबासाहेब भिवसाने यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गंगापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते बस स्टँड ते राजीव गांधी चौकाकडे जाणारा रोड हा पूर्णपणे खराब झालेला आहे त्यामुळे शहरातील नागरिकांना या रस्त्याने चालणे अवघड झाले आहे रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यावरती दगड देखील असल्यामुळे चार चाकी वाहनातून टायर खालून दगड उडून अनेक नागरिक जखमी झाले आहेत व व्यापाऱ्यांच्या दुकानात दगड उडून जातात यामुळे जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही व तसेच सदर रस्त्यावरती धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असून येणारे व जाणारे व्यापारी व नागरिकांना यांचा त्रास सहन करावा लागत असून धुळीमुळे दम्याचे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे तसेच शहरातील नागरिक व व्यापारी बांधवांनी आपल्याकडे वेळोवेळी निवेदन दिलेले आहे परंतु आपण या विषयाकडे जाणुन बुजुन दुर्लक्ष केले आहे गंगापूर शहरांमध्ये चार चौक असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुख्य रस्ता विकासापासून जाणून-बुजून वंचित ठेवला आहे दोन लोकप्रतिनिधींच्या भांडणात रस्त्याची दूर अवस्था झाली आहे तरी या रस्त्याचे काम पंधरा दिवसाचे आत करावे नसता रिपब्लिकन सेनेच्या वतीने बेशरम लागवड आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे या निवेदनावर जिल्हा सचिव बाबासाहेब भिवसाने, तालुका अध्यक्ष आनंद भिवसाने, तालुका महासचिव समीर सय्यद, शहराध्यक्ष अब्बू चाऊस, तालुका उपाध्यक्ष नारायण फुलारे, नवनाथ नरवडे, अनिस पठाण, मुन्ना शहा, संजय पवार, रवी शिंदे, ईदरीश बाश्वान, राहुल सोनवणे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!