मृत सुधाकर वैराळ यांच्या कुटुंबियांना श्री.स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान च्या वतीने दहा हजार रुपयांची मदत
गंगापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील वरखेड येथे नांदूर मधमेश्वर कालव्याच्या वाहत्या प्रवाहात २९ ऑगस्ट रोजी टेम्पो पडून दुर्दैवी मृत्यू झालेल्या सुधाकर वैराळ यांच्या कुटुंबीयांची श्री. स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष वाल्मिक शिरसाठ यांनी वरखेड येथे भेट घेऊन सांत्वन करीत धीर दिला.घरातील कर्ता पुरुष गेल्याने तसेच तीन वर्षाच्या चिमुकलीच्या निधनाने भयभीत झालेल्या या कुटुंबाला केवळ अर्धा एकर जमीन आहे.मयत सुधाकर वैराळ याला भाऊ नाही घरात वृद्ध आई वडील पत्नी आणि एक महिन्याच्या मुलीसह तीन मुलं आहेत.श्री स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान च्या वतीने आधार म्हणून आज रोख स्वरूपात दहा हजार रुपयाची मदत देण्यात आली आहे.शासन दरबारी पाठपुरावा करून शक्य तेवढी जास्त मदत या कुटुंबाला मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी वाल्मिक शिरसाठ यांनी दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ.अरुण जऱ्हाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.