पंढरपूर येथील देवगडच्या मठात सदगुरू किसनगिरी बाबांच्या पालखी सोहळयाच्या निमित्ताने नामदेव गाथा पारायण सुरू

पंढरपूर येथील देवगडच्या मठात सदगुरू किसनगिरी बाबांच्या पालखी सोहळयाच्या निमित्ताने नामदेव गाथा पारायण सुरू

नेवासा(प्रतिनिधी)श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या आषाढी वारी पालखी सोहळयाच्या निमित्ताने पंढरपूर येथील देवगड संस्थानच्या मठामध्ये नामदेव गाथा पारायणास देवगड श्री गुरुदेव दत्त पिठाचे महंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे.नामदेव गाथा पारायण सोहळयात शेकडो वारकरी भाविक सहभागी झाले आहे.
श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा बालसंन्याशी यांच्या आषाढी वारी पालखी सोहळयाच्या निमित्ताने पंचदिनात्मक कार्यक्रमाचे आयोजन देवगड संस्थानच्या पंढरपूर येथील मठात करण्यात आले असून यावेळी सुरू असलेल्या नामदेव गाथा पारायणाचे वाचक व्यासपीठ प्रमुख म्हणून देवगडचे संत सेवक हभप नारायण महाराज ससे, गायनाचार्य हभप गणपत महाराज आहेर,हभप संजय महाराज निथळे यांच्यासह मृदुगाचार्य दादा महाराज साबळे,संतसेवक बाळू महाराज कानडे, तात्या महाराज शिंदे,हभप शुभम महाराज बनकर हे सेवा देत आहे.देवगड संस्थानच्या पंढरपूर येथील मठामधील प्रांगणात श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांचे पादुका मंदिर असून याच मंदिराच्या सभामंडपामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पाडले जात आहे.
आषाढी वारी श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या पालखी सोहळयाच्या निमित्ताने पहाटे ४ ते ६ काकडा भजन,सकाळी ९ ते ११ नामदेव गाथा पारायण,११ ते १२ भोजन,दुपारी ३ ते ५ श्री नामदेव गाथा पारायण,सायंकाळी ५.३० ते ७ हरिपाठ, आरती भोजन त्यानंतर रात्री ८.३० ते १०.३० कीर्तन असे दैनंदिन कार्यक्रम सुरू आहे.सोहळयाच्या निमित्ताने नेवासा तालुक्यातील करजगाव व पंचक्रोशीतील श्री किसनगिरी बाबा स्वच्छता मंडळाचे महिला व पुरुष भाविक हे स्वच्छता अभियानसह वाढप्याची देखील सेवा देण्याचे काम करत आहे.
गुरुवारी आषाढी एकादशीच्या निमित्ताने दि.२९ जून रोजी रात्री ८.३० ते १०.३० यावेळेत श्री गुरुदेव दत्त पीठ देवगड संस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांचे कीर्तन होणार असून शुक्रवारी दि.३० जून रोजी गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबांच्या सकाळी ७ ते ९ यावेळेत होणाऱ्या काल्याच्या किर्तनाने पंचदिनात्मक आषाढी वारी पालखी सोहळयाची सांगता करण्यात येणार आहे. पंचदिनात्मक कार्यक्रमाच्या निमित्ताने भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री दत्त मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!